डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील स्वातंत्र्य सैनिक जयराम बळवंत पाटील यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी जिल्हा परिषदेच्या बोर्डी प्राथमिक शाळेचे मतदान केंद्र गाठून मतदान केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ८५ वर्षांवरील मतदारांना गृह मतदानाचा निवडणूक आयोगाने दिलेला हक्क त्यांनी नाकारला होता. स्वतः मतदान केंद्र गाठून मतदान करण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली होती. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती. त्यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र गाठून सर्वप्रथम मतदान केले. त्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.🎉🎊