केळवे : मा. श्री. हरिहर जयराम पाटील सर, आदर्श विद्या मंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक यांचा "अमृत महोत्सवी गौरव सोहळा." सोहळ्याचे अध्यक्ष : मा. श्री. विनोद लक्ष्मण पाटील. विश्वस्त, नूतन विद्या विकास मंडळ, केळवे प्रमुख अतिथी : सौ. मंगला खाडिलकर, सुसंवादिनी गुरुवार दिनांक ११ एप्रिल २०२४ स्थळ : मंगलधाम सभागृह, केळवे आदरणीय श्री. हरिहर जयराम पाटील यांची वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याने नूतन विद्या विकास मंडळ, केळवे या संस्थे कडून त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा केळवे शीतलाई मंगलधाम, केळवे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अमृत महोत्सवी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या सुसंवादिनी सन्माननीय मंगलाताई खाडिलकर तर अध्यक्ष पद पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते, केळवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय श्री विनोद लक्ष्मण पाटील यांनी भूषविले.. आदर्श विद्या मंदिर, केळवे या शाळेत पाटील सर 1971 साली शिक्षक म्हणून रुजू झाले..1978 साली मुख्याध्यापक झाले. सलग 29 वर्ष ते मुख्याध्यापक होते..2007 साली निवृत्त झाले.निवृत्त होऊन आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर अवघ्या सात वर्षात मुख्याध्यापक पदाचा कारभार त्यांना सांभाळावा लागला. 36 वर्षाच्या सेवेत मुख्याध्यापक पदाचा 29 वर्षाचा एवढा मोठा कार्यकाळ संपूर्ण महाष्ट्रात कुणाला मिळाला नसेल. पण तो योग पाटील सरांच्या वाट्याला आला आणि त्यांनी मिळालेल्या या संधीचे सोने केले. 1960 साली स्थापन झालेल्या या आदर्श विद्या मंदिर शाळेत फक्त इयत्ता 8 ते 11 पर्यंत वर्ग होते. आज शाळेत अंगणवाडीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी एस. एस. सी. पर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडतो आहे. सरांचे विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात उच्च पदस्थ म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पाटील सर स्वतः या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.. सर, आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!